Posts

Showing posts from October, 2022

बोध

एकदा काय झाले... घरामागे परड्यामध्ये एक तुरीचे रोप आले. काही दिवस निघून गेले हळूहळू मोठे झाले . पण चिंता लागून राहिली  अजून फुल का नाही आले? अजून फळ का नाही आले? त्याला एक आंबा लागावा त्याला एक पेरू लागावा  याला एक चिकू लागावा  आणि एक फणस सुद्धा लागावा ऐकून माझी इच्छा  सगळ्यांना खूप हसू आले. मी विचार करू लागलो  हे असे कसे झाले? प्रत्येक बाळाचे हात वेगळे पाय वेगळे  त्यालाच चालवणारे त्याचे विचार वेगळे होय ना? मग वेडे का झाले आई बाप हे सगळे ? त्याने अंबानी व्हावे, अमिताभ व्हावे, सचिन व्हावे आणि विवेकानंद ही व्हावे श्रीराम ही व्हावे आणि हनुमान ही व्हावे  असे त्यांना का वाटावे? तूर जोपासावी तूर प्राप्त व्हावी, पोर जोपासावे पोर प्राप्त व्हावे.  धरती मातेला जोपासण्यासाठी  त्याने कुण्याही वाटेने चालावे. वाटेमध्ये त्याच्या स्वर्ग असावा  सर्वांसाठी त्याने स्वर्ग बनवावा एवढाच बोध सगळ्यांना व्हावा एवढाच बोध सगळ्यांना व्हावा.

बहना

बहना... एक खूबसूरतसा गहना कुछ समय पहनना और खूब संभालकर रखना। सोने का गहना जिसमे हिरे मोती जडे हो केवल तन को सजाते है । पर बहना तेरा क्या कहना! तू मन को सजाती है। तू मन को सजाती तू घर आंगण को सजाती है। तू पुरुषार्थ को सजाती जीवन के हर क्षण को सजाती है। बाजार में खरीदते जब कोई गहना  तो उसका मूल्य कुछ रुपये मे चुकाते है। पर जब वह  घर ले आते है तो वो अमूल्य बन जाता है। बहना भी एक इंसान साधारणसी  पर जब हम भाई बन जाते है तो  हमारे लिए वही बहना बन जाती है अनन्यसाधारणसी।   चमक जिसकी सदा बनी रहे वह है असली गहना  दमक जिसकी सदा बनी रहे  वो है असली बहना । हर घर आंगन में हो ऐसी बहना हर मन मे हो हर एक बहना दुवा हमारी दिल की तुम सदा खुश रहना तुम सदा खुश रहना।

जागला

जागला हल्ली कुणाच्याही नावाने चौक असतात , कुणाच्याही नावाने रस्ते असतात , शाळा असतात, भवन असतात . ते महान असतात,असा समज असतो, पण ते तसे असतीलच असे मात्र नाही. नेते समाजाचे 'सेवक' असतातच असे नाही, बातम्या नेहमी खऱ्या असतात असेही नाही , ज्या मुद्द्यावर चर्चा होत असतात जोरदार... ते महत्त्वाचे असतात असा समज असतो, पण तसे ते असतीलच असे मात्र नाही. चर्चेत भाग घेणाऱ्यांना विद्वान असे म्हणतात, काहीजण वैचारिक गटांचे प्रवक्ते म्हणवितात, ते आज एका गटात, उद्या दुसऱ्या गटात असू शकतात. देश-दुनिया-समाजसाठी हे गट बनतात असा समज आहे, पण तसे ते असतीलच असे मात्र नाही. राजकीय पक्ष सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करतात म्हणे, कळत नकळत कोण्या एका समाजाचे बनतात समाजात फुट पाडून आपली पोळी भाजतात . 'विविधतेत एकता'असे सतत सांगत असतात, पण त्यांना 'एकता' हवी असते असे मात्र मुळीच नाही. आताशा हे कळू लागलेय सगळ्यांना आता आपण का फसायचं? खूप वेळा फसलो आत्तापर्यंत ते कसं काय विसरायचं? बदल करतो तो समाज असतो, विकास करतो तो समाज करतो, सोबत जगतो मरतो तो समाज असतो, मग व्यक्ती आणि पार्टी च्या मागे कशाला धावाय...

दोन कविता

1. शुभमंगल सावधान! लग्न करावं, लग्न करावं,सगळे जण म्हणतात. पण का करावं का न करावं कितीजण जाणतात? तुमच्याआमच्या सगळ्यामध्ये काही दुर्गुण असतातच ना! आमच्या नि तुमच्यामध्ये काही  सद्गुणही असतातच ना! कुणी सर्वथा वाईट नसतो ना कोणी सर्वगुणसंपन्न सद्गुणांची वृद्धी व्हावी दुर्गुणांचा निचरा व्हावा. असा तुमचा आमचा संबंध व्हावा. दोघांनी मिळून एक चांगलं विश्व तयार करावं . दोघांनी मिळून हे विश्व अधिक चांगलं करावं . दोघांनी मिळून दोघांच्या कल्याणासाठी जगावं . दोघांनी मिळून दोनही घरांचं नांव मोठं करावं . शुभ-मंगल-सावधान, शुभ, मंगल, सावधान. इंद्रियांच्या क्षणिक सुखासाठी प्राणीसुद्धा जगतात. प्रेम करून एक झालेले अहंकारासाठी लढतात . "लग्न झालं की प्रश्न सुटला", असं म्हणतात. खरं सांगायचे तर, प्रश्न सारे निर्माण तिथून होतात. शुभ-मंगल-सावधान, शुभ,मंगल,सावधान. खूप मोठे घर आणि प्रॉपर्टी पाहून लग्न करतात. मोठ्या लोकांचे पण प्रश्न सुद्धा मोठे असतात. पैसा प्रसिद्धी प्रदर्शन यासाठी जीव जमीन जनावरे मारतात स्पर्धा आणि ईर्षा यासाठी स्वतःसुद्धा जनावर बनतात. शुभ-मंगल-सावधान, शुभ, मंगल, सावधान. वैभवाचे प्रदर्...