''अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."
''अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत." असे नागरिकशास्त्र मध्ये लहानपणापासून शिकत आलो आहोत. आजची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की आपण नाण्याची नागरिकत्वाच्या नाण्याची ही एक बाजू सोयिस्करपणे विसरत चाललो आहोत. परंतु गेल्या 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरून आपल्या प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संबोधनात जे 5 प्रण सांगितले, त्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा चर्चा व्हावी आणि नागरीतत्वासाठी याचा सदैव विचार व्हावा असे वाटू लागले आहे. वर्ष 2019 हे भारतीय राज्यघटना अमलात आल्यापासून चे सतरावे वर्ष होते.यानिमित्ताने संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात महामहिम राष्ट्रपती,माननीय प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांनी या विषयाला अधोरेखित केलेले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रामण्णा यांनी सुद्धा या विषयासंदर्भात "मूलभूत कर्तव्य हे काही केवळ तांत्रिक बाब नाही तर ती सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे" असे प्रतिपादन केले आहे. १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा...