राष्ट्रीय सणानिमित्त...
भारत माता की जय! राजकीय नेत्यांचे " अंध समर्थक " आणि "अंधविरोधक" , "अंधभक्त " आणि " गुलाम'' असे काही शब्द रूढ झाले आहेत. हे शब्द टीका करण्यासाठी वापरले असले तरीही यात काही प्रमाणात वास्तव आहेच. प्रत्येकाने आपले आपले आत्मपरीक्षण करून ठरवावे हे जास्त चांगले. अशा प्रवृत्तीचे अस्तित्व देशाच्या प्रगती मधला एक अडथळा बनू शकतो. वस्तुतः हे सर्वजण देशावर प्रेम करणारे आहेत. "प्रेम करतात तरीही त्रासदायक ठरतात " हे काही बरे नाही ! 15 ऑगस्ट 2020 . लाल किल्ल्यावरून " आपला नेता " किंवा " त्यांचा नेता" बोलतोय असे कधीही समजू नये. देशाचे प्रधानमंत्री बोलतायत, ते कधी ही विसरू नये. अमर्याद माहितीचे स्त्रोत गहन अध्ययन आणि चतुर आकलन याचा सार असते ते भाषण! त्यामध्ये प्राप्त केलेल्या उपलब्धीचं प्रदर्शन असतं. कोणत्या पक्षाचे सरकार आहे, त्या पक्ष्यांचं नसते ते यश... ते भारत सरकारचे यश असतं. ते भारतीय जनतेच यश असत. ( त्यात काही अपयश असेल तर तेही आपलंच असत...